फुले,शाहू,आंबेडकर सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?
"प्राजक्ताचं सांडणं हे प्रारब्धच असतं
तरीही तो फुलणं थांबवत नाही
पायदळी जरी तुडविले कोणी तरी
सुंगधाच देणं तो देणं थांबवत नाही".
(संकलन-आम्ही साहित्यिक,फेसबुक गृप)
वरील विकास पवार यांच्या चारोळी प्रमाणे महापुरुषांच्या विचारांची महती असते.
काळ कुठलाही असो व त्यातील महापुरुष, विचारवंत हा कधीच पूर्ण नसतो.त्यांना मर्यादा असतात .महापुरुषांचे विचार जरी महान असले आज आपण त्यांना एका चौकटीत बंद केले आहे.फुले माळ्यांचे,आंबेडकर हे बुध्दांचे,शिवाजी हे मराठ्यांचे असे वाटून टाकले आहे.त्यांच्या नावाचे व विचारांचे ऐवढ्या प्रमाणात तुकडे केलेत कि 'विचार' म्हणजे काय हे शोधावे लागेल? ईश्वराने सृष्टी निर्माण केली.ती सुंदर दिसावी म्हणून सप्तरंगाची मनसोक्त उधळण केली.किती स्वार्थ रहित विचार व कृती आहे ईश्वराची.पण स्वार्थी मानवाने काय केले जातीचे राजकारण करुन रंग वाटून घेतले.भगवा रंग हिंदूचा,निळा बौद्ध लोकांचा,हिरवा मुसलमान लोकांचा इत्यादी.
शाहू,फुले,आंबेडकर इत्यादी सह अनेक विचारवंत यांनी त्या त्या काळात मौल्यवान विचारांचे योगदान दिलेले आहे.या विचारांचा मुळ उद्देश हा हा मानवी कल्याण व विकास हा होता.पण काही स्वार्थी लोकांनी विचारवंत यांच्या नावाने दुकानदारी चालू केली आहे.याचा अर्थ या महापुरुषांच्या विचारांना आप कमाईचे साधन बनवले.वास्तविक पाहिलं तर स्वतः शाहू,फुले,आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले आहे कि त्यांचे विचार हे साधन आहे.आमची वाटणी करु नका.आमच्यापैकी कुणी एकही मानवी जीवनाचे सत्य सांगू शकत नाही.आपण त्यांचा अभ्यास करुन या विचारांना साध्य बनविले पाहिजे.
चित्रपटात एखादा कलाकार हा आपल्या अभिनयाने लोकांना एक क्षणभर हसवू शकतो पण नेहमी साठी त्यांचे दुःख दूर करु शकत नाही. हा आपण प्रेरणा मात्र घेवू शकतो.तरच विचारातून आचार साध्य होतील.
- जयंत जाधव,लातूर.
Comments
Post a Comment